लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो; आणि त्यात उलटून गेलेले वय यांमुळे काही जणांची शिक्षणाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसविण्यासाठी आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीच पुढाकार घेतला आहे.

Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Pune, Bhagyashree Navatke, Economic Offenses Wing, Jalgaon, embezzlement, bhaichand hirachand raisoni, BHR Credit Union, Home Department,
‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपीची गृहखात्याकडे तक्रार
rape, Vasai, School Rape Vasai, Yadvesh vikas shala rape,
Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
Retired police protest in front of Police Commissioner office to Nitesh Rane statement
नितेश राणेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिसांची निदर्शने; जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्यालयासमोर आंदोलन
Kalyan, Khadakpada Police Station, School Security, CCTV Installation, Student Safety,
कल्याणमधील शाळांना सीसीटीव्ही बसविण्याच्या पोलिसांच्या सूचना
Badlapur, Suspension, headmistress,
बदलापूर : मुलींच्या अत्याचाराप्रकरणी मुख्याध्यापिकेसह चौघांचे निलंबन, शाळेचा माफीनामा
Jitendra awhad marathi news
कळवा, मुंब्रा, दिव्यात एकाच कामावर दोनदा खर्च?; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

मुंबईस्थित टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या नवभारत साक्षरता अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरातील महापालिकेच्या मध्यवर्ती शाळा क्रमांक एकमध्ये प्रौढशिक्षणासाठी आता रात्रशाळा प्रकल्प सुरू झाला आहे.

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यातून चार गुन्हेगार हद्दपार; पोलीस अधीक्षकांचे आदेश

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या रात्रशाळा उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, महापालिकेचे उपायुक्त अभिजित बाविस्कर, शिक्षणाधिकारी दीपाली पाटील, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी मुकेश मुनेश्वर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रौढ साक्षरतेला चालना देण्यासाठी, विशेषत: स्थलांतरित आणि समाजातील दुर्बल घटकांमध्ये शिक्षणाची गंगा आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगितले.