कांद्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मुरलीधर भीमा लहाने (वय ३२, रा. बेजगाव) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्यात जिल्हा बँक आणि सोसायटीच्या कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुरलीधर लहाने यांच्या पश्चात आई व पत्नी असा परिवार आहे. मनमाड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यातील नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्याची ही तिसरी आत्महत्या आहे. तालुक्यातील ढेकू येथील शिवाजी सूर्यवंशी यांनी वाढते कर्ज व कांद्याला कमी भाव मिळाल्यामुळे आपल्या शेतात विष पिऊन आत्महत्या केली होती. तर गोंदेगाव येथील भगवान बोडके (वय ३२) या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहीरीत उडी टाकून आत्महत्या केली होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more farmer commit suicide in nashik district
First published on: 15-05-2017 at 15:48 IST