लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील लवाटेनगर येथील जलकुंभातील वितरण प्रणालीतील दोषामुळे संभाजी चौकातील रहिवाश्यांना चार ते पाच दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाकडून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे वारंवार सांगितले गेले. परंतु, अद्याप अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणी आले. पाण्याचे टँकरही उपलब्ध झाले नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे.

tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Roads in Nashik under water due to heavy rain
अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात
Potholes in Pune are deadly Bike falls and accidents increase 20 percent increase in trauma patients
पुण्यातील खड्डे जीवघेणे! दुचाकी घसरून अपघात वाढले; दुखापतीच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांची वाढ
Water scarcity, Nashik rain, tanker, Nashik latest news,
मुसळधार पावसातही नाशिकमध्ये टंचाईचे संकट, ४५७ गाव-पाड्यांना १११ टँकरने पाणी
dams, Nashik district, overflow,
चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर
kamshet s tribal woman
कामशेतमधील आदिवासी पाड्यावरील चिमुरड्यांसाठी ‘ससून’ बनले ‘माय’!

संभाजी चौक परिसरात काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात स्थानिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लवाटेनगर येथील जलकुंभातून या परिसरात पाणी पुरवठा होतो. व्हॉल्व्हमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, चार ते पाच दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार मॅग्मोप्रकाश कॉलनीतील रहिवासी अंजली बुटले यांनी केली. यासारखी समस्या प्रेस्टिज पार्क व आसपासच्या रहिवाशांना भेडसावत आहे.

आणखी वाचा-निर्यातबंदी उठविण्याची तयारी अन् नाशिक जिल्ह्यात कांद्याची उसळी

या संदर्भात स्थानिकांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारीही केल्या. आज सुरळीत होईल, उद्या सुरळीत होईल अशी उत्तरे दिली गेली. परंतु, रविवारपर्यंत सुधारणा झाली नाही. ज्यांच्याकडे दोन नळ जोडण्या आहेत, त्यांच्याकडे कमी दाबाने पाणी आले. उर्वरित रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी होती. त्यामुळे पाण्याचे टँकर देखील उपलब्ध झाले नसल्याचे बुटले यांच्यासह अन्य नागरिकांनी सांगितले.

या संदर्भात पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या भागातील व्हॉल्व्हमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नमूद केले. दुरुस्ती झाली असून लवकरच उपरोक्त भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.