पनवेल : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व कागदपत्रे ईडीला देऊन या प्रकरणातील सत्यता दाखवून द्यावी असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. विरोधकांनाच नोटिसा जातात याचा अर्थ ते चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात आणि भाजपचे नेते नियोजन पद्धतशीर व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांची कागदपत्रे ईडीला सापडत नाहीत असे वक्तव्यही आठवले यांनी केले.

बुधवारी कामोठे येथे आरपीआयची कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.  काळा पैसा देशात वाढू नये यासाठी सक्त वसुली संचालनालय (ईडी) विभाग असल्याचे त्यांनी सांगितले.  विरोधकांनाच नोटिसा द्या असा कोणताही आदेश नाही असे त्यांनी नमूद केले.