उरण : मागील आठवडाभरात आलेल्या शीतलहरीमुळे समुद्रातील तापमानातही घट होऊन वातावरणात बदल झाल्याने मासळीच्या प्रमाणात ४० टक्क्यांपेक्षा अधिकने कमी आल्याने आवक घटली आहे. त्यामुळे बाजारातील मासळीचे प्रमाणच कमी झाल्याने मासळीच्या दरात वाढ झाली आहे. तर मांसाहारी लोकांनी मासळीला पर्याय म्हणून चिकनचा पर्याय निवडला आहे. तर वातावरणात तापमान वाढल्यास पुन्हा एकदा मासळीची आवक वाढण्याची आपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.

उरण तालुका हा समुद्रकिनाऱ्यावर असल्याने येथील नागरिकांचप्रमुख अन्न हे मासळी आहे. मात्र सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला असून तापमानात घट झाल्याने गारवा निर्माण झाला आहे. याचा परिणाम मासेमारी व्यवसायावरही झाला आहे.

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…

मासळी व्यवसाय हा वातावरणातील बदलांवर अवलंबून असल्याने अनेकदा बदललेल्या वातावरणामुळे मासेमारांना मासळी दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो. पावसाळय़ात पावसामुळे तसेच जिवाला धोका असल्याने मासेमारी बंद असते, तर थंडीच्या काळात गारठा निर्माण झाल्यास त्याचाही परिणाम मासेमारीवर होतो. अशाच प्रकारचे वातावरण उरण परिसरात तयार झाल्याने थंडगार वातावरणामुळे मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात घटली असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमारांनी दिली.

येथील नागरिक जीवन पाटील म्हणाले की, बुधवार असल्याने मी मासळी खरेदीसाठी आलो होतो, मात्र मासळीचे दर अधिक असल्याने मी मासळीऐवजी चिकन घेणे पसंत केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.