‘एपीएमसी’त उघडय़ा वीजपेटय़ांचा धोका!

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व बाजार आवारात उघडय़ा वीज पेटय़ांची दुरवस्था झालेली आहे. गेले कित्येक वर्षांपासून या वीजपेटय़ांची देखभाल दुरुस्ती न केल्याने आज या विजपेटय़ा धोकादायक झाल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून या ठिकाणी बाजारात कर्मचारी, व्यापारी, वाहतूकदार, ग्राहक, माथाडी कामगार, सफाई कामगार, सुरक्षारक्षक अशा अनेकांची सतत वर्दळ असते. बाजार समितीची स्थापना झाल्यापासून बाजार आवारातील वीजपेटय़ा व वीज वाहिन्या मोठय़ा प्रमाणात खराब झाल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. मागील आठवडय़ात दाना बाजारामध्ये एका ट्रक चालकाला उघडय़ा वीज वाहिन्यांचा झटका लागून गंभीर दुखापत झाली होती.
अशा अनेक घटना घडत आहे, भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे बाजार आवारातील वीजपेटय़ा व वीज वाहिन्यांची तपासणी करून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे. याबाबत मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी तक्रार केली आहे. सदर प्रकरण हे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असून लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक राजराम माने यांनी दिले.
एपीएमसी बाजारात वर्षांनुवर्षे जुन्या देखभाल दुरुस्ती न केलेल्या वीजपेटय़ा आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांची दुरुस्ती न केल्याने आज त्या विजपेटय़ा धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे यांची दुरुस्ती करण्याची मागणी महावितरणाकडे करण्यात आली आहे. – बाळासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे सहकार सेना

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ