श्रुती पानसे

माणसासमोरच्या समस्या कधी संपत नाहीत. या समस्या सतत चालूच राहणार आहेत. या समस्या त्यातल्या त्यात बऱ्या पद्धतीने सोडवता येणं हे खरंतर बुद्धिकौशल्याचं काम आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

हे बुद्धिकौशल्य लहान मूलही वेळोवेळी दाखवतं. घरात दोनच माणसं असताना ‘मी नाई रंग सांडवला,’ असं बिनदिक्कत सांगतं. याचा अर्थ पुढे हे लोक मला रागवणार, दटावणार (आणि माझ्या समस्या वाढणार) त्यापेक्षा आधीच सारवासारव केलेली बरी. हे बुद्धिकौशल्य ते लहानसं मूलही दाखवतं.

अशा पद्धतीने लहानपणापासून मुलं खरं तर स्वत:च समस्या सोडवत असतात. पण कधी कधी त्यांचा ‘अनुभव’ कमी पडतो. समजा मूल एखाद्या गोंधळाच्या प्रसंगात सापडलेलं आहे. काय करावं हे सुचत नाही आणि त्याच वेळेला त्याला आई-बाबांची आठवण येते. आता हा सगळा गोंधळ निस्तरला जाईल याच विश्वासाने रडणारं मूल तक्रारी घेऊन आई-बाबांकडे धाव घेतं. एवढय़ानंही त्याचं मन आश्वस्त होतं. ते शांत होतं

हे सर्व घडतं कारण विश्वासाची भावना. जेव्हा समस्या निर्माण होते, कसला तरी गोंधळ होतो, तेव्हा ताणामुळे कॉर्टसिॉल निर्माण होतं. जरासं शांत झाल्यावर आपल्याला या समस्येतून कोण सोडवेल, याचा विचार केल्यावर योग्य व्यक्तीचं नाव सुचतं. ते सुचल्यावर लगेच आपल्या मेंदूतल्या पिटय़ूटरी ग्रंथींमध्ये ऑक्सिटोसिन या नावाचं रसायन निर्माण होतं. कारण विश्वासाची भावना निर्माण झालेली असते. ज्या वेळी आपल्याला प्रेमाची व्यक्ती समोर दिसते किंवा तिची फक्त आठवण येते किंवा नामस्मरण, एखादा मंत्र, हातामध्ये एखादं चित्र, एखादं प्रतीक, विशिष्ट पुस्तक, ज्यावर आपली मनापासून श्रद्धा आहे, विश्वास आहे, ज्याचं आपण स्मरण करतो, त्या वेळेला ऑक्सिटोसिन हे रसायन मेंदूत तयार झालेलं असतं. आणि आता सर्व काही नीट होणार अशी भावना मनामध्ये निर्माण होते.

असाही अनुभव आलेला असेल की, प्रत्यक्ष कोणीही मार्ग दाखवायला आलेलं नसतं. गोंधळ आणि ताण या गोष्टी या रसायनामुळे दूर सारल्या जातात. मळभ दूर होतं. त्यानंतर आपण लॉजिक आणि अनुभव वापरतो. समोरची वाट दिसायला लागते.

contact@shrutipanse.com