– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पातंजल योगसूत्रानुसार मनात येणारे विचार पाच प्रकारचे असतात. माणसाला आकलन होते ते योग्य किंवा चुकीचे असे दोन्ही प्रकारचे असू शकते. योग्य आकलनाला ‘प्रमाण’ आणि अयोग्य आकलनाला ‘विपर्यय’ म्हणतात. ‘समोर साप आहे’ असा विचार येतो; पण जवळ जाऊन पाहिले की, ती दोरी आहे हे दिसते. ‘साप आहे’ वाटणे म्हणजे विपर्यय आणि दोरी आहे हे ज्ञान म्हणजे प्रमाण होय. आकलन नेहमी योग्य असतेच असे नाही, हेच योगातही सांगितले आहे. योग्य किंवा अयोग्य ज्ञान प्रत्यक्ष, अनुमान आणि शाब्द अशा तीन मार्गानी होते. पाच ज्ञानेंद्रिये माहिती देतात ते प्रत्यक्ष, त्यावरून तर्क करून काढले जाते ते अनुमान आणि दुसऱ्या व्यक्तीचे ऐकून किंवा वाचून आपण विश्वास ठेवतो ते शाब्द प्रमाण होय. या तीनही प्रकारांनी चुकीचे ज्ञानही होऊ शकते. वर्तमानपत्रात, टीव्ही किंवा समाजमाध्यमांवरून आपण माहिती घेतो ती शाब्द प्रमाणानुसार असते. मात्र ती माहिती नेहमी बरोबरच असेल असा विश्वास ठेवणे योग्य नाही. ती माहिती नेहमी चूकच असते असे अनुमानही नेहमीच योग्य होणार नाही. आपल्याला झालेले आकलन ही एक शक्यता आहे, असेच योगशास्त्राचेही प्रतिपादन आहे.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on mood in yoga abn
First published on: 12-06-2020 at 00:06 IST