डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

सजीवांच्या आरोग्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्याचा परिणाम कार्बन, नायट्रोजन आणि इतर प्रमुख जैवभूरासायनिक चक्रांवर देखील होतो. समुद्रकिनाऱ्यापासून ते थेट महासागराच्या अतिखोल पाण्यापर्यंत सर्वत्रच सागरी जीवनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. वातावरणातील एकूण ऑक्सिजनपैकी अर्धा ऑक्सिजन महासागरातून मिळतो.

nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

ऑक्सिजन दोन प्रकारे महासागरांत मिसळतो. एक म्हणजे वातावरणातून थेट, तर दुसरा म्हणजे प्रकाशसंश्लेषणाने जे वनस्पतीप्लवक आणि इतर सागरी वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागालगत ऑक्सिजन तयार करतात तो. मात्र महासागर जितका ऑक्सिजन निर्माण करतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याचा वापर होतो. असे झाल्यास महासागरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, म्हणजेच डीऑक्सिजनेशन होते. परिणामी सागरी परिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन बिघडून जीवसृष्टी धोक्यात येते. ‘निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय संघ’ (‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर’) यांच्या अहवालानुसार १९५० पासून जगातील महासागरातील विरघळलेल्या ऑक्सिजनच्या पातळीत एकूण दोन टक्के घट झाली आहे आणि २१०० पर्यंत त्यात आणखी १ ते ७ टक्के तूट होऊ शकते.

ऑक्सिजनची पातळी निरनिराळय़ा समुद्रांत वेगळी असून महासागराच्या बहुतेक भागांमध्ये ऑक्सिजनची घट होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ. पाण्याचे तापमान वाढले की पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो. तापमानवाढीमुळे पाण्याच्या थरांची सरमिसळ कमी होते. यामुळे महासागर आणि वातावरणातील ऑक्सिजनची देवाणघेवाण कमी होऊन ऑक्सिजनची पातळी घटते.

मुख्यत: किनारपट्टीच्या पाण्यात प्रदूषणामुळे नायट्रेट आणि फॉस्फेटसारख्या पोषकतत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने विषारी शैवाल अतिप्रमाणात वाढते, त्यामुळेही ऑक्सिजन कमतरता निर्माण होते. सागराच्या वरच्या १ किमी भागामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. याच भागात जास्तीत जास्त सागरी प्रजाती असतात. या सजीवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी जैवभूरसायनचक्र आणि प्रजाती वितरण या दोहोंत बदल होतात. या बदलांचा संपूर्ण सागरी परिसंस्थेवर परिणाम होतो. प्रादेशिक किनारपट्टीच्या पाण्यात ऑक्सिजन स्तर कमी झाल्याने जैवविविधता आणि अधिवासांवर परिणाम होतो.

महासागरातील तापमानवाढ कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन तात्काळ कमी केले जाणे आवश्यक आहे. तसेच, शेती आणि सांडपाणी या दोन्हींमधून पोषकतत्त्वांचा होणारा निचरा थांबवण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून किनाऱ्यावरून वाहून येणाऱ्या पाण्यातील पोषकद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन विषारी शैवाल वाढीस आळा बसेल.