पठाण समाजातले उच्चशिक्षित डॉ. जाकीर हुसेन हे विख्यात शिक्षणतज्ज्ञ होते. १९२० साली त्यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत स्थापन केलेल्या मुस्लीम विद्यापीठाचे रूपांतर पुढे जामिया मिलिया इस्लामियामध्ये झाले. त्याच वर्षी ते पीएच.डी. करण्यासाठी बíलन युनिव्हर्सटिीत गेले. या मधल्या काळात जामिया इस्लामीची आर्थिक परिस्थिती, प्रशासन आणि शिक्षणाचा दर्जा ढासळून संस्था बंद पडायच्या मार्गावर होती. जाकीर हुसेन परत आल्यावर संस्थेची सर्व सूत्रे स्वत:कडे घेऊन पुढची २१ वर्षेचोख प्रशासन आणि उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा, मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन त्यांनी आजची जामिया मिलीया इस्लामिया नावारूपाला आणली. १९४७ पर्यंत ते जामिया मिलीयाच्या कुलगुरूपदावर होते.

विद्यार्थी दशेतच महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या जाकीर हुसेनची गांधींशी भेट प्रथम झाली १९२६ मध्ये. जाकीर हुसेनांच्या धर्मनिरपेक्षता आणि गांधींच्या आदर्शाचे पालन करण्यामुळे जामिया मिलीया संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी असहकार आणि तत्सम स्वातंत्र्य चळवळींमध्ये अनेक वेळा सहभागी झाले. १९३७ साली जाकीर हुसेन भारताच्या राष्ट्रीय शिक्षा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले गेले. या काळात ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कामकाजातही लक्ष देत होतेच. जामिया मिलीयाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झाल्यावर १९४७ मध्ये ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर नियुक्त झाले. या काळात या संस्थेचे काही प्राध्यापक, कर्मचारी मुस्लिमांसाठी वेगळा देश, पाकिस्तान व्हावा म्हणून आंदोलन करीत असताना जाकीर हुसेनांनी स्वतंत्र भारत अखंड राहावा म्हणून त्यांचे मन वळवले. यामुळे बॅरिस्टर जिनांचेही शत्रुत्व त्यांनी स्वीकारले. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. जाकीर हुसेन १९५२ आणि १९५६ असे दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले पुढे त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. १९६२ साली ते भारताचे उपराष्ट्रपती आणि १९६७ साली प्रजासत्ताक भारताच्या सर्वोच्चपदी म्हणजे राष्ट्रपतिपदी नियुक्त झाले.

Barti, Mahajyoti, Police Pre- Recruitment Training,
पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण; आचारसंहिता लागल्यामुळे…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
maharashtra government forced barti sarathi mahajyoti to adopt uniform guidelines
विश्लेषण : स्वायत्त संस्थांसाठी ‘समान धोरणा’चा स्पर्धा परीक्षार्थींना फटका कसा?
Students
मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या ४०० कोटींच्या निविदांचे धोरण फसले, लाखो विद्यार्थी वंचित
mla mahendra dalvi wife angry on education officers over rcf school issue
आरसीएफ शाळेचा प्रश्न हातघाईवर…आमदार दळवींच्या पत्नीचा शिक्षण अधिकाऱ्यांवर रोष
Department of Skill Development honored Vinayak Mete and Anand Dighe in the ranks of National Men Social Reformers
राष्ट्रपुरुष, समाजसुधारकांच्या पंक्तीत मेटे, आनंद दिघेंना स्थान
nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!
Development of 39 agar station sites of ST on commercial basis Print politics news
‘एसटी’च्या ३९ जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास; भाडेपट्ट्याच्या कालावधीसह चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ

धर्मनिरपेक्ष शैक्षणिक कार्य आणि राजकारणातील सहभागाबद्दल १९५४ मध्ये पद्मविभूषण आणि १९६३ मध्ये भारतरत्न हे किताब देऊन त्यांचा बहुमान झाला. १९६९ मध्ये त्यांचे देहावसान झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com