वाडा: वाडा तालुक्यात शेतकऱ्यांनी जोडणीसाठी रचून ठेवलेल्या भात पिकाच्या उडव्याला लागल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसात पाठोपाठ घडल्या असून यामागे घातपात व कौटुंबिक शत्रुत्व कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी हवालदील झालेला असतानाच दुसरीकडे वाडा तालुक्यातील चांबले गावात गेल्या दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचे भाताचे भारे पेटवून देण्याची घटना ताजी आहे. शुक्रवारी (१ डिसेंबर) ला रात्री गातेस येथील एका शेतकऱ्याचे खळ्यात झोडणीसाठी ठेवलेले ९०० भाताचे भारे अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना घडल्याने तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Demand for money pune, Hadapsar police,
पुणे : जोगवा मागणाऱ्या एकाकडे हप्त्याची मागणी, हडपसर पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
काही वस्तूंवरील ‘जीएसटी’ दरात कपात? मंत्रिगटाकडून कर अधिकाऱ्यांच्या समितीला मूल्यमापनाचे निर्देश
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Keshavrao Bhosale Theater Kolhapur Gutted by Massive Fire in Marathi
Keshavrao Bhosale Theater Fire : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची प्रशासनाला भीती
Traffic Jams school area, Navi Mumbai, Koparkhairane, Ghansoli, traffic jams near schools, traffic police, public awareness, school administration,
नवी मुंबई : शाळा परिसरांतील वाहतूक कोंडीवर उपायांसाठी पोलिसांची जनजागृती

हेही वाचा… भारत नेट योजनेत कोट्यावधीचे नुकसान, तीन वर्षांपासून इंटरनेट सेवेत अडथळे

गेल्या दोन दिवसापूर्वी चांबले गावातील शेतकरी दशरथ बाळू पाटील यांच्या भाताचे पीक ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खळ्यात ठेवण्यात आलेले ६०० भाताचे भारे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी माध्यरात्री नंतर तालुक्यातील गातेस (खुर्द) गावातील शेतकरी श्याम अप्पा पाटील यांच्या घराजवळ ठेवण्यात आलेले ९०० ते एक हजार भाताचे भारे अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. श्याम पाटील यांच्या कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी भाताच्या भाऱ्यांना लागलेली आग रात्रभर विझविण्याचा प्रयत्न केला.

मात्र शनिवारी सकाळपर्यंत ही आग धुमसत होती. कोणी अज्ञात व्यक्तीने भाऱ्यावर पेट्रोल टाकून ही आग लावली असावी असा संशय पाटील कुटुंबाने व्यक्त केला आहे. वाडा पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी नितेश पाटील यांनी केली आहे. या आगीत श्याम पाटील यांचे दीड ते दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या दोन्ही घटना घडल्या त्या ठिकाणी वाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.