लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : पालघर समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका मासेमारी बोटीला गुजरात कडे जाणाऱ्या एका मालवाहू जहाजाने शनिवार ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.२० वाजताच्या सुमारास धडक देऊन अपघात केला आहे. अपघातात बोटीचे मोठे नुकसान झाले असून धडक देणाऱ्या जहाजाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दरम्यान नौकेत अडकलेल्यांनी वायरलेस वरून इतर बोटींना संपर्क करून मदत घेत किनारा गाठला आहे.

High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
Bhayandar, Cleanliness beach Uttan,
भाईंदर : महापालिकेमार्फत उत्तनच्या समुद्र किनाऱ्याची स्वच्छता, ३ हजार जणांचा सहभाग, ३७ टन कचरा जमा
Worli-Bandra sea bridge, Man Suicide,
मुंबई : वरळी-वांद्रे सागरी सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या
Mumbai, Worker died, Worker hit by car,
मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना
after Ganeshotsav is over there is a rush to buy fish
उरण : गणेशोत्सव संपताच मासळी खरेदीसाठी गर्दी
Ten accused who blocked vehicles on the highway and committed robberies arrested in Chhattisgarh
वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

धाकटी डहाणू येथील संतोष मर्दे यांच्या मालकीची “सागर सरिता” ही नौका घेऊन आठ खलाशी डहाणू बंदरात २० नौटीकल मैल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. दरम्यान ६ एप्रिल रोजी एका अज्ञात मालवाहू जहाजाने या नौकेला धडक देऊन अपघात केला आहे. अपघाताच्या धक्क्याने बोटीमधील दोन खलाशी समुद्रात पडले असून त्यांना वाचवण्यात इतर खलाश्यांना यश आले आहे. जहाजाच्या धक्क्याने नौकेच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून नौकेमध्ये पाणी शिरले होते. खलाशांनी वायरलेस वरून जवळच मासेमारी करणाऱ्या “हिमसाई” नौके वरील खलाशांना संपर्क करून मदत मागितली. दरम्यान रात्री १ वाजताच्या सुमारास हिमासाई बोटीवरील खलाशांनी अपघात ग्रस्त नौकेस बांधून डहाणू खाडी पर्यंत सोडले आहे.

आणखी वाचा-पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत

अपघात ग्रस्त नौकेला भारतीय कोस्ट गार्ड विभागाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्यामुळे मच्छिमारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून अपघात जन्य परिस्थितीत शासकीय यंत्रणेची मदत मिळत नसल्यामुळे भारतीय कोस्टगार्ड यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघात ग्रस्त नौकेचे मालक संतोष मर्दे यांनी याविषयी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात जहाजावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाणगाव पोलिसांकडून हा गुन्हा कोलाबा येथील येल्लो गेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.