
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू आणि जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. यावर्षी ३ मे रोजी अक्षय्य तृतीया आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवसाचे हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे.

या दिवशी कोणतेही शुभ काम केल्यास त्यात यश मिळतेच असा मानस आहे.

अक्षय तृतीयेची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे या दिवशी अनेक जण सोन्याच्या खरेदीला पसंती दर्शवतात.

या दिवशी सोने खरेदी केलं तर घरात कायम संपत्ती येते, अशी एक श्रद्धा आहे.

संपत्तीचा देव म्हणजे कुबेर यांनी शंकराची उपासना करून याच दिवशी संपत्ती मिळवली अशी धारणा आहे.

संपत्तीचा मापदंड म्हणजे कुबेर असल्यामुळे या दिवसाला हिंदू धर्मात संपत्तीच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीच क्षय होत नाही, जे कधीच संपत नाही असा होतो.

या दिवशी सोने खरेदी करणं म्हणजे कुबेराची मर्जी राखणं, त्याला खूश करणं. जेणेकरून घरात कायम संपत्तीचा वरदहस्त राहील, अशी श्रद्धा आहे.

हिंदूंचं थोर संचित व महाकाव्य असलेलं ‘महाभारत’ लिहिण्यास वेद व्यासांनी आजच्याच मुहूर्तावर सुरूवात केली होती अशी मान्यता आहे.

त्यामुळे सोने खरेदी करण्याशिवाय नवीन उपक्रम, उद्योग सुरू करण्यासाठीही हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत योग्य असा मानण्यात येतो.

(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)