तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज पाटण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं कौतुक करत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चहा विकण्यावरूनही टीका केली.

हेही वाचा – “नोटीस धाडायची असेल तर खुशाल धाडा..” म्हणत प्रसिद्ध गायिका नेहा राठोडने आणलं बेरोजगारीवर नवं गाणं

BJP Surat Candidate Wins Unopposed
काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा बिनविरोध विजय; पराभवाच्या भीतीने ‘मॅचफिक्सिंगचा आरोप
Amit Shah
अमित शाहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा…”
Amethi Lok Sabha Election 2024
अमेठीमधून कोण निवडणूक लढवणार? राहुल गांधींनी वाढवला सस्पेन्स; म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे…”
Vishal Patil Sangli Filled nomination
सांगलीत मविआला मोठा धक्का; काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम, म्हणाले…

नेमकं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

आगामी २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात. राहुल गांधींमध्ये ती क्षमता आहे. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा ही एक क्रांतिकारी यात्रा होती. त्यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील, अशी प्रक्रिया सिन्हा यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गेमचेंजर ठरतील, असा दावाही केला.

तेजस्वी यादवांचं शत्रुघ्न सिन्हाकडून कौतुक

पुढे बोलताना त्यांनी बिहारचे उपमुख्यंत्री तेजस्वी यादव यांचंही कौतुक केलं. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. त्यांना आता चांगला अनुभव आला आहे. बिहारचे भविष्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. मुळात मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्यासाठी तुम्हाला योग्यतेबरोबरच समर्थनाची गरज असते, असे ते म्हणाले.

हेही वाचा – सोनिया-राहुल यांच्या अनुपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीवर खल

पंतप्रधान मोदींवर टीका

दरम्यान, त्यांनी चहा विकण्याच्या दाव्यावरूनही पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदींनी चहा विकला होता, यावर माझा विश्वास नाही. ती केवळ एक अफवा होती. खोटा प्रचार होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.