अ‍ॅजिटप्रॉप नेहमीच संघर्षांस प्रोत्साहन देत असतो. हा संघर्ष कशासाठीही असू शकतो. तो राजकीय असू शकतो वा सामाजिक. अण्णा आंदोलनात या संघर्षांचे स्वरूप थेट राजकीय होते. ते अत्यंत योजनाबद्ध होते. येथे खरा प्रश्न हा आहे, की त्यातील अ‍ॅजिटप्रॉपने कोटय़वधी लोकांना कसे गुंगवले?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा वर्षांपूर्वी सर्व देश गदागदा हलवून सोडला होता अण्णा आंदोलनाने. भ्रष्टाचारमुक्ती हा त्या आंदोलनाचा नारा होता आणि जनलोकपाल कायदा ही मागणी. त्यासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले होते आणि संपूर्ण देश त्यांना पाठिंबा देण्यासाठी गांधी टोपी घालून रस्त्यावर उतरला होता. ठिकठिकाणी भ्रष्टाचारविरोधी मोर्चे, निदर्शने होत होती. दिल्लीतील जंतरमंतर आणि नंतर रामलीला मैदान ही तीर्थक्षेत्रे बनली होती. वाहिन्यांवरून २४ तास केवळ अण्णाधून वाजत होती. समाजमाध्यमांतून सरकारविरोधाला पूर आला होता. काँग्रेसचे सरकार हे सरकार नसून सैतान आहे, हीच जनभावना होती. त्या सरकारविरुद्ध जनतेने दुसरे स्वातंत्र्ययुद्ध छेडले होते. आज ते युद्ध, ते आंदोलन, तो भ्रष्टाचारविरोध आणि ती जनलोकपालची मागणी.. सारे कापरासारखे विरून गेले आहे. मग त्या २०११ने नेमके काय साधले? तर त्याचे उत्तर आहे – त्यातून २०१४ अवतरले..

मराठीतील सर्व प्रचारभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitprop propaganda used in anna movement
First published on: 04-12-2017 at 01:03 IST