मुंबई-पुणे महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघतांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज पुन्हा या मार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया मार्गात आडोशी बोगद्याजवळ चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र, या अपघाताचा परिणाम वाहतुकीवर झाला असून, ५ ते ६ किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अपघातस्थळी वाहतुक पोलिसांचे पोहोचले असून, बचाव पथकाच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.