पालकमंत्री गिरीश बापट यांचे आवाहन महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर महापुरुषांचे विचार प्रत्येकाने जोपासण्याची गरज आहे, असे मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पिंपरीत आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवास बापट यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यानंतर, त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आदींसह भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. िपपरी पालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे, गटनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. महोत्सवानिमित्त आयोजित ‘निळी धम्मपहाट’ या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.