पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात संततधार पावसामुळे १८.६३ टीएमसी पाणीसाठा असून,  धरणांची एकूण टक्केवारी ६३.९१ टक्के इतकी  आहे. तर त्यापैकी खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांवरील पाणी कपातीचे संकट टळले असल्याचे धरणातील सध्याच्या साठ्यावरून स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट या महिन्याच्या सुरुवातीला निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाणी नियोजनाबाबत अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली होती. मात्र आगामी गणेशोत्सव लक्षात घेता, सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठयामध्ये कमालीची वाढ झाली असून आज सकाळी चार ही धरणात मिळून १८.६३ टीएमसी पाणीसाठा आहे. ६३.९१ इतके टक्के धरण भरले आहे.

धरण                 टीएमसी         टक्के

खडकवासला      १.९६         ९९.१६%
पानशेत               ७.५३         ७०.७५%
वरसगाव             ७.४७          ५८.२८%
टेमघर                 १.६७          ४४.९५%

सध्याचा पाणीसाठा  – १८.६३ टीएमसी व ६३.९१  टक्के

मागील वर्षी धरणातील पाणीसाठा –  २९.१५ टीएमसी व १००टक्के