विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय, आजपासून अंमलबजावणी

पिंपरी : आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर यापुढे अभिषेक आणि महापूजा होणार नाहीत, त्याऐवजी माउलींच्या पादुकांचे पूजन केले जाणार आहे. समाधीची होत असलेली झीज आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (२७ डिसेंबर) करण्यात येणार आहे. या बदलास होत असलेला विरोध पाहता देवस्थानने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

माउलींच्या ऐतिहासिक संजीवन समाधीचे चिरकाल व चिरंतन जतन, संवर्धन करण्यासाठी समाधीवरील अभिषेक आणि महापूजांची संख्या मर्यादित करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने यापुढे समाधीऐवजी पादुकांचे पूजन केले जाईल. अशाप्रकारे बदल करण्याचा निर्णय आळंदी देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.

अभिषेक करताना वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यामुळे संजीवन समाधीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला असून तसा अहवाल पुरातत्त्व विभागानेही दिला असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आले.

या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (२७ डिसेंबर) करण्यात येणार आहे. या बदलास विरोध सुरू झाल्याने देवस्थानने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसे विनंतीपत्र देवस्थानचे मुख्य विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी पोलिसांना दिले आहे.

वारकऱ्यांच्या तक्रारी, सीसीटीव्हीतील गर्दीची दृश्ये, दर्शनाची लांबवर लागणारी रांग, भाविकांची गैरसोय असे विविध मुद्दे लक्षात घेऊन देवस्थानने पूजा आणि अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माउलींच्या संजीवन समाधीचे चिरकाल जतन झाले पाहिजे, ही त्यामागची मुख्य भूमिका आहे. पूजा, अभिषेकाऐवजी माउलींच्या चलपादुकांवर पूजा करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. संस्थानचा हा निर्णय असला, तरी ही वारकऱ्यांचीही भूमिका आहे.

– अ‍ॅड. विकास ढगे पाटील, मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान