‘शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेल्या कर्जावरील ३६ हजार कोटी रुपयांचे व्याज भरतानाच शासनाची कसरत होत असल्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही,’ असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.