पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या पुण्यात आंतरजातीय विवाह केल्याने एका कुटुंबाला समाजातून २३ वर्षांपूर्वी जातीपंचायतीने बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. समाजात परत घेण्यासाठी सव्वा लाख रुपये दंड मागितल्याप्रकरणी श्री गौड ब्राह्मण समाजाच्या जात पंचायतीतील पंचांसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
orange cargo truck overturned at Buldhana
ट्रक उलटला; मात्र लोकांची झाली चंगळ! ग्रामस्थांनी पोते भरून…

याबाबत प्रकाश नेमीचंद डांगी (वय ४६, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, हडपसर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ताराचंद काळूराम ओझा (रा. गंज पेठ), भरत नेमीचंद मेवाणी (रा. अरण्येश्वर), मोतीला भोमाराम शर्मा डांगी (रा. खिवाडा, जि. पाली, राजस्थान), प्रकाश लालूराम बोलद्रा उर्फ शर्मा (रा. पद्मावती), संतोष उणेचा (रा. भवानी पेठ), बाळू शंकरलाल डांगी (रा. पाषाण), भवरलाल डांगी (रा. मारवाड जंक्शन, राजस्थान), हेमाराम ओझा (रा. सिनला, जोधपूर, राजस्थान) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- अंदमानातील बेटाला पुणेकर वीर योद्ध्याचे नाव; परमवीर चक्र विजेते दिवंगत राम राघोबा राणे यांचा सन्मान

फिर्यादी प्रकाश डांगी श्री गौड ब्राह्मण समाजातील असून ते रिक्षाचालक आहेत. १९९८ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. समाजाकडून बांधण्यात येणाऱ्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी ते गेले होते. बिबवेवाडीतील एका मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंचांनी डांगी यांना मंदिरातील बैठकीत कसा आला, तुला समाजातून बहिष्कृत करण्यात आले आहे. तू निघून जा, असे सांगितले.

हेही वाचा- पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी नोंदणीत यंदा वाढ; ८ लाख ९९ हजार ९२१ विद्यार्थ्यांची नोंदणी

निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नव्हते. समाजाच्या विविध कार्यक्रमांचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. पद्मावतीतील एका सभागृहात नुकतेच स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे निमंत्रण डांगी यांना देण्यात आले नव्हते. समाजातील प्रत्येक कार्यक्रमांपासून डांगी यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. डांगी यांनी समाजात परत घ्या, असे पंचांना सांगितले. समाजाचे अध्यक्ष मोतीला शर्मा, भरत मावाणी यांच्याकडे अर्ज केला होता. समाजात पुन्हा यायचे असेल तर एक लाख २५ हजार रुपये दंड मागण्यात आला. अखेर डांगी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार २०१६ च्या सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा कलम ६ आणि ७ नुसार तसेच भारतीय दंडसंहिता कलम ३४ नुसार पंचांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.