पुणे : केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठीच्या इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इथेनॉलच्या दरात दर्जानिहाय सरासरी दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशभरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांनुसार उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सध्या ६३.४५ रुपये प्रति लिटरचा दर मिळत होता. तो आता ६५.६० रुपये इतका असेल. सी हेवी मोलॉसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४६.६६ रुपये प्रति लिटर दर मिळत होता, तो आता ४९.४० रुपये इतका असेल. बी हेवी मोलॉसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सध्या ५९.०८ रुपये प्रति लिटर दर होता, तो आता ६०.७३ रुपये इतका होणार आहे.

Paytm loss at five and a half billion
पेटीएमचा तोटा साडेपाच अब्जांवर; रिझर्व्ह बँक निर्बंधांचा पुढच्या तिमाहीतही फटका बसण्याचे संकेत
Estimated 17 to 19 percent increase in income for jewelry sellers
सोन्यातील तेजीचा असाही परिणाम; सराफांचे उत्पन्न १७ ते १९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
N.M. Joshi Marg, BDD Redevelopment,
ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास : म्हाडाने काढलेली घरांची सोडत रहिवाशांना अमान्य, भेदभाव झाल्याचा आरोप, न्यायालयात धाव
Ghatkopar accident, mnc emergency medical system,
घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर… मोठ्या दुर्घटनांसाठी पालिकेची आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा सज्ज करणार!
Go Digit 2615 crore IPO to Virat Kohli could yield a multiple return of 263 percent
‘गो डिजिट’चा २,६१५ कोटींचा ‘आयपीओ’ विराट कोहलीला २६३ टक्क्यांचा बहुप्रसवा परतावा शक्य
reserve bank
सोने तारण कर्जाचे रोखीत वितरण २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंतच ;वित्तीय कंपन्यांना काटेकोर पालनाचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश
health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
india s oil import expenditure fell by 15 2 percent in last fiscal year due to oil imports from russia
रशियन तेलामुळे आयात-खर्चात १५.२ टक्के घट; आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत ७.९ अब्ज डॉलरची बचत

केंद्र सरकारने २०२५पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण जाहीर केले आहे. डिसेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या नव्या इथेनॉल पुरवठा वर्षांपासून हे नवे दर लागू होणार आहेत. देशात सध्या साखर कारखान्यांत आणि खराब झालेल्या अन्नधान्यांपासून इथेनॉल निर्मिती केली जाते.

साडेआठ हजार कोटींची उलाढाल

राज्यात १२८ कारखाने आणि ६९ असवाणी प्रकल्पांना इथेनॉल तयार करण्याची परवानगी आहे. यंदा राज्यात सरासरी १४० कोटी इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता आहे. सरासरी दुसऱ्या क्रमांकाचा दर (६०.७३) गृहीत धरल्यास इथेनॉल विक्रीतून राज्याला सुमारे ८,५०० कोटी रुपये मिळतील. वाढीव दरामुळे कारखान्यांना सुमारे २८० कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. या वाढीव आर्थिक उत्पनाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केलेली वाढ नक्कीच शेतकरी आणि साखर कारखान्यांना आर्थिक बळ देणारी आहे. कारखान्यांना तयार झालेले इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोच करावे लागते. त्यासाठी प्रत्यक्षात जो वाहतूक खर्च होतो, तेवढा खर्च कारखान्यांना मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेला दर कारखान्यांना मिळायचा असेल, तर कारखान्यांना प्रत्यक्ष वाहतूक खर्च मिळाला पाहिजे.

जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ