राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करत खळबळजनक विधान केलं होतं की, मागील काही दिवसांपासून काही लोक गाडीत बसून माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. तसेच या संशयितांचे फोटोही त्यांनी ट्विट केले होते. यावेळी नवाब मलिकांनी या फोटोतील लोकांना कुणी ओळखत असेल तर माहिती देण्याचंही आवाहन केलं होतं. यावर आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करून म्हणाले…!

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “अरे राज्यात सरकार आहे त्यांचं. जरी एक गृहमंत्री तुरूंगात असले, दुसरे गृहमंत्री हे मनाविरुद्ध गृहमंत्री झालेले असले, सारखे आजारी पडत असले या सगळ्या ताणतणावामुळे. तरी, गृहमंत्री त्यांचं असणारं सरकार आहे. काय हास्यास्पद वाक्य आहे की पाळत ठेवतात. तुमचं पोलीस डिपार्टमेंट काय करतयं?”

केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी सोडलं मौन; म्हणाले “पाटील काय चीज आहे…”

नवाब मलिक यांनी गाडीत बसलेल्या लोकांचे फोटो ट्विट करत, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.” असं म्हटलं होतं.

महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…

राज्यातील महाविकासआघाडी सरकार आज आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.