पुणे : राज्यातील ५४ महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १४ कोटींची अनामत रक्कम पडून असल्याचे समोर आले आहे. करोना काळात विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असल्याने आर्थिकदृष्टय़ा मागास विकास विद्यार्थ्यांसाठी या रकमेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनामत रक्कम भरावी लागते. महाविद्यालयातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांनी ती रक्कम परत देणे अपेक्षित असते. कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी माहिती अधिकाराअंतर्गत राज्यातील वेगवेगळय़ा भागातील ५४ महाविद्यालयांत अर्ज करून अनामत रकमेची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार संबंधित ५४ महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १४ कोटी ३७ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colleges state colleges students deposit amount creating financial difficulties students ysh
First published on: 17-04-2022 at 00:02 IST