पुणे : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात दीड ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. शनिवारी सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. राज्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली. त्याखालोखाल अमरावती ४३.८, बुलढाणा ४०.०, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

Imd predicts heavy rainfall in maharashtra from 3rd september due to low pressure formed in bay of bengal
राज्यात पावसाचा पुन्हा जोर ? जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील घडामोडी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Rainy weather, temperature, Pune Rainy weather,
पुणे : पावसाची उघडीप, उन्हाचा चटका; जाणून घ्या, विभागनिहाय तापमान
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी
rain Maharashtra, rain news, Maharashtra weather,
राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?
Roads in Nashik under water due to heavy rain
अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात
Loksatta explained Why water supply by tankers in Marathwada even in rainy season
विश्लेषण: पावसाळ्यातही मराठवाड्यात टँकरने पाणीपुरवठा का?
rain, Vidarbha, Maharashtra rain,
विदर्भात पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी, पण कधी…

हेही वाचा – ऊन, पाणी आणि माढा !

मराठवाड्यात परभणीत ४३.६, औरंगाबादमध्ये ४१.६, बीडमध्ये ४३.१ अंश तापमान होते. मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४३.४, सांगली ४१.६, सातारा ४०.९, जळगावात ४२.३ आणि मालेगावात ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. किनारपट्टीवर डहाणूत ३५.८, कुलाब्यात ३३.२ आणि रत्नागिरीत ३३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील २३ जिल्ह्यांत पारा चाळीशी पार गेला होता.

हेही वाचा – पौड रस्त्यावर थरार, भरधाव पीएमपीची तीन वाहनांना धडक

विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी

हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.