पुणे : “माणसाला प्रगती करायची असेल तर उद्योग-व्यवसायाशिवाय पर्याय नाही. १३ वर्षे नोकरी केली पण ते आपले काम नाही म्हणून सोडून दिली. रस्त्यावर फटाके विकण्यापासून ते मराठी माणूस जो व्यवसाय करत नाही असा मटण, चिकनचा व्यवसाय केला. माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही,” असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. ते लोणावळ्यात भाजपा आणि कोळी महासंघ यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा – पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघड

pune, Gang Vandalized Vehicles, Bibwewadi, Gang Vandalized Vehicles in Bibwewadi, koyta, unleashed terror, pune Gang Vandalized Vehicles, crime news, pune police, marathi news, crime in pune,
पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू
anti trafficking cells busted sex racket in pune
पुण्यात ३०२ क्रमांकाच्या खोलीत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, ३ तरुणींची सुटका
maval lok sabha seat, Maha Vikas Aghadi, Sanjog Waghere Patil, Similar Name, Independent Candidate, Independent Candidate Similar Name to Sanjog Waghere Patil, Nomination Rejected, lok sabha 2024, election 2024,
पिंपरी : मावळमध्ये ‘या’ वाघेरेंचा अर्ज बाद
jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

हेही वाचा – पुणे : दुचाकी चोरट्याला आठ महिने सक्तमजुरीची शिक्षा

नारायण राणे म्हणाले की, उद्योग हा माणसाला प्रगतीकडे घेऊन जातो. सुखी समाधानी, आनंदी जगायचं असेल आणि पुढील पिढी सक्षम करायची असेल तर उद्योगाशिवाय मार्ग नाही. मीदेखील १३ वर्षे नोकरी केली. पण मला कळलं की हे माझं काम नाही. दीड ते दोन हजार पगार मिळायचा. तोही घरी पोहचेपर्यंत मित्र भेटले की संपायचा. मी मुंबईत अनेक व्यवसाय केलेत. नारायण राणे हे नाव फार मोठं वाटते. पण मी छोटे छोटे व्यवसाय केले. रस्त्यावर फटाके विकले, गॅरेज, टॅक्सी, टेम्पो असे अनेक व्यवसाय केले. मराठी माणूस जो व्यवसाय करत नाही तोही केला. मटण, चिकनचा व्यवसाय केला. माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम याला बुद्धिमत्तेची जोड असेल तर प्रगती होते, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. दिवसा नोकरी रात्री शाळा हे करून आज इथपर्यंत मी पोहोचलो आहे. राजकारणातील सर्व पदे उपभोगली आहेत असेही राणे म्हणाले.