पिंपरी: शहरवासियांना नागरी सुविधा देत असताना यापुढे नवे तंत्रज्ञान आणि प्रणालींचा अवलंब कामकाजात करावा लागणार आहे. यासाठी जगासोबत प्रवास करणे गरजेचे आहे. नागरिकांचा वाढता सहभाग आवश्यक असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संवाद प्रणालीचा उपयोग करण्याकडे आपला कल असला पाहिजे, असे मत पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले. आता भारतातील कोणत्याही शहराशी आपण स्पर्धा करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण या स्पर्धेत तीन बक्षिसे, तसेच राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धेत १० लाखांचे बक्षीस पिंपरी पालिकेला मिळाले. या कामगिरीबद्दल प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्तांचा पालिका अधिकाऱ्यांच्या वतीने बैठकीत सत्कार करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad compete city country administrator rajesh patil faith ysh
First published on: 21-04-2022 at 00:02 IST