पिंपरी : आगामी पिंपरी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय मेळावे सुरू केले असून त्याद्वारे शहरातील नागरी प्रश्नांवरून भाजपला लक्ष्य केले आहे. पाणीपुरवठा, रेडझोन, खंडित विजपुरवठा, लघुउद्योगांच्या समस्या आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांवर गेल्या तीन वर्षांपासून सक्तीने पाणीकपात लादण्यात आली असून, दिवसाआड पाणी हे भाजपचे पाप आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. धरणात पुरेसा पाण्याचा साठा व शहरात नियमितपणे मुबलक पाऊस पडत असतानाही पाणीकपात करणे दुर्दैवी आहे. नागरिकांच्या हक्काचे पाणी पळवण्यात आल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.

International Country Relations in Electoral Politics
लेख: निवडणुकीच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय संबंध!
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?

हेही वाचा >>> नवीन अभ्यासक्रमात महापुरुषांची चरित्रे; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पिंपरी-चिंचवडसह चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेली बैठक निव्वळ फार्स असून लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. त्यांच्या समस्यांकडे आतापर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या भाजपला पालिकेच्या निवडणुका तोंडावर लघुउद्योजकांचा पुळका आला आहे. रेडझोन, शास्तीकराचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन भाजपने दिले. केंद्रात व राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार असतानाही शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. आतापर्यंत शास्तीकरावर गळा काढणारे भाजप नेते आता शास्तीकरावर काहीच बोलायला तयार नाहीत, याकडे गव्हाणे यांनी लक्ष वेधले आहे.