पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये महाविद्यालयात निवड होऊनही विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेशासाठी जात नसल्याने जागा अडवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीमार्फत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ९६ हजार १५० जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्यांतून ६७ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर नामांकित महाविद्यालयांसह एकूण १४० महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नसल्याने २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत ही फेरी राबवली जाईल. शिक्षण विभागाने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या दैनंदिन गुणवत्ता फेरीत पसंती नोंदवलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळूनही काही विद्यार्थी प्रवेशासाठी जात नाहीत. त्यामुळे त्या जागा भरण्याऐवजी अडवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्याही एका कनिष्ठ महाविद्यालयात निवडीची एकच संधी मिळेल. कोणत्याही महाविद्यालयात एकदा निवड झाल्यानंतर त्या दिवशी संबंधित विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याला दुसऱ्या दिवशी त्या महाविद्यालयासाठी अर्ज करता येणार नाही.

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव