पुणे : राजस्थानातील पंतप्रधानांचे भाषण देशाच्या ऐक्याच्या विरोधात आहे. पंतप्रधान असे कसे बोलू शकतात, असा प्रश्न मला पडला. त्यांचा विरोध केला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. तसेच गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात शेतीसंबंधीचे प्रश्न वाढले आहेत. सन २०१४पासून अमित शहा यांच्या पक्षाकडे सत्ता आहे. केवळ माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांच्या हितासाठी काय केले ते सांगावे. परंतु अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित आहे, त्यावर जास्त काय बोलायचे, असा टोलाही पवार यांनी हाणला.

हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन; पुण्यात वाहतूककोंडी

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे शपथपत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्या वेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी पवार यांच्यावर शेती, शेतकरी यांच्यासंदर्भात टीका केली होती. मी कृषिमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अमरावतीत आले होते. त्यांना तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी प्रत्यक्षात दाखवून देण्यात आल्या. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या १० वर्षांत अमरावती, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेसच्या काळापेक्षा आता दीडपट अधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत. परंतु अमित शहा त्यावर काही बोलत नाहीत. वीस वर्षांआधी काय झाले, चाळीस वर्षांआधी काय झाले हे विचारण्यापेक्षा गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले ते सांगावे, असेही पवार म्हणाले. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, की पहिल्या टप्प्यात जनमत भाजपविरोधात गेले आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. म्हणून जात-धर्म, हिंदू-मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत.