डॉ. अरुणा ढेरे यांचे मत
अंतर्बाह्य़ कवी असलेल्या सुधीर मोघे यांना काय करायचे आणि काय म्हणायचे हे नेमकेपणाने ठावूक होते. समृद्ध जगण्याचे प्रतिबिंब हे त्यांच्या कवितेमध्ये पडत गेले. ‘कविता सखी’ हे मोघे यांच्या कवितेचे आत्मकथन आहे, असे मत प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी व्यक्त केले.
स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सुधीर मोघे यांच्या ‘कविता सखी’ या पुस्तकाचे प्रकाशन अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेले ‘कविता सखी’ हे सदरलेखन परममित्र प्रकाशनतर्फे प्रकाशित केले आहे. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, डॉ. शुभदा सुधीर मोघे आणि प्रा. प्रकाश भोंडे या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात संजय गाखले, शाल्मली गोखले आणि विक्रांत महाजन यांनी ‘कविता एका निरंकुशाची’ हा मोघे यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम सादर केला.
ढेरे म्हणाल्या, मराठी रसिकता घडविण्यामध्ये भावकवितेचे वेगळे स्थान आहे. गदिमा आणि शांताबाई शेळके यांच्या भावगीतांची मैफल मोघे यांनी पुढे नेली.
आनंदाचं तळं गढूळ होऊ न देण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते. या भरलेल्या तळ्याची ओल त्यांच्या लेखनात दिसते. कलाविष्काराचे वेगळे प्रयोग हाताळले असले तरी त्यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. हे प्रयोग यशापयशामध्ये तोलता येत नाहीत. त्यामागची मन:पूर्वकता आणि गांभीर्यता महत्त्वाची असते.
संगोराम म्हणाले, कवीला कविता सुचली कशी यापासून ते कवितेचे रूप कसे असते हे उलगडावे हा उद्देश या सदरलेखनामागे होता. एक माणूस कवितेकडे पाहतो या आकृतीबंधातून हे लेखन करणार असे मोघे यांनी सांगितले होते.
या लेखनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. आपण कवी आहोत हा जाज्वल्य अभिमान फार थोडय़ा लोकांना असतो त्यामध्ये मोघे होते. शुभदा मोघे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रकाश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अरुण नूलकर यांनी
सूत्रसंचालन केले.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”