वृत्तपत्रातील बातमीचे महत्त्व न्या. भगवती यांनी ओळखले आणि मग त्यातूनच चार दशकांपूर्वी जनहित याचिका या संकल्पनेचा उदय झाला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कायदा गाढव असतो. म्हणून न्यायालयांनी शहाणे असावे लागते. प्रश्न असा आहे, की तशी ती असतात का? तर याबाबत वाद होऊ शकतो. शहाणपणाची नेमकी व्याख्या काय, असा उपप्रश्नही यानिमित्ताने विचारला जाऊ शकतो. परंतु या देशातील न्यायव्यवस्थेवर अजूनही लोकांचा विश्वास आहे. यावरून ती बऱ्यापैकी शहाणी आहेत असे म्हणता येईल. त्या शहाणपणाचे एक उदाहरण म्हणून बोट दाखविले जाते ते जनहित याचिकेच्या संकल्पनेकडे. एखाद्याने न्यायालयास साधे टपाल पाठवावे, कुठे तरी एखाद्या वृत्तपत्रात छोटीशी बातमी प्रसिद्ध व्हावी आणि न्यायालयाने कधी स्वत:हून त्याची दखल घ्यावी, तर कधी त्यावरून कोणी केलेली जनहित याचिका दाखल करून घ्यावी; निबर सत्तेला धारेवर धरावे, असा हा प्रकार. गेल्या अर्ध शतकात आपल्याकडे ही संकल्पना चांगलीच रुजली. यातूनच पुढे एक शब्द प्रचलित झाला – न्यायिक सक्रियता. भारतातील विधिव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारी, तिला एक संवेदनशील चेहरा देणारी अशी ही बाब. पण अलीकडच्या काळात तीही वादग्रस्त झाली आहे. एका पक्षाचे म्हणणे असे, की न्यायालयाचे काम न्यायदानाचे. त्यांनी ते इमानेइतबारे करावे. न्यायाधीशांनी आपल्या न्यायालयाची आणि चेंबरची मर्यादा ओलांडून सामाजिक कार्यकर्ते बनू नये. कारण त्यातून न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी सैल होण्याची शक्यता असते. माजी सरन्यायाधीश ए. एम. अहमदी यांचा तर या गोष्टीला विरोधच होता. कार्यकर्त्यांची ही भूमिकाच मुळी न्यायव्यवस्थेवर लादण्यात आलेली आहे असा त्यांचा आक्षेप होता.. आणि त्याला संदर्भ होता त्यांचे पूर्वसूरी, सरन्यायाधीश प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती यांच्या न्यायिक सक्रियतेचा. या संकल्पनेचे अग्रदूतच ते.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chief justice of india justice pn bhagwati marathi articles
First published on: 17-06-2017 at 03:39 IST