भारताला तळाचा क्रमांक देणारा पर्यावरण अहवाल आपण फेटाळून लावू, पण प्रश्न जमिनीवरील वास्तवाचाही आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरण मूल्यांकन निर्देशांकात भारतास ‘तळा-गाळात’ पाठवणारा पाहणी अहवाल आपणास मान्य नाही, हे नैसर्गिक म्हणायचे. जगाने आपले फक्त गुणगान करावे, आमच्यात दोष नाहीतच, असले तर आमचे आम्ही पाहून घेऊ ही आपली आंतरराष्ट्रीय राजनीती. तेव्हा हा अहवाल नाकारणे ओघाने आलेच. या पाहणीत हवेची शुद्धता, वायुप्रदूषण, पाणी व त्याचा दर्जा, स्वच्छता, जैवविविधता जतन, जलस्रोतांचे नियमन, कचऱ्याचे व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, जलवायू परिवर्तन, कार्बन उत्सर्जन या साऱ्या महत्त्वाच्या मानकांमध्ये भारताची कामगिरी अतिशय सुमार दर्जाची आढळली. पर्यावरण स्वास्थ्य, परिसंस्थात्मक स्थिरता व हवामान बदल हे या अहवालातले तीन महत्त्वाचे घटक. यापैकी पहिल्या व दुसऱ्यात आपण १७८ व्या स्थानावर. आपल्याखाली कोण? तर पाकिस्तान व मार्शल आणि सॉलोमन बेटे हे देश. अनेकदा आपल्यापेक्षा खालच्या क्रमांकावर कोण यावर आपण समाधानाचे मोजमाप ठरवत असतो. इथे तर तीही सोय उरली नाही. तिसऱ्या घटकात भारत १६५ व्या स्थानावर. या अहवालातली उत्तम कामगिरी म्हणाल तर हीच. बाकी सर्व ठिकाणी तळाचा म्हणजे १८० वा क्रमांक कायम.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India environment performance ranks india ranks lowest in environment performance index zws
First published on: 11-06-2022 at 01:16 IST