आंबेडकरी चळवळीच्या गाण्यांच्या परंपरेचा आज ‘इव्हेन्ट’ होत असताना, चळवळही या गाण्यांचे संचित विसरलेली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा निराळी आहे. अगदी आगळीवेगळी आहे. ज्यांना आदल्या वर्षीपर्यंत या ‘भिमजयंती’चे अस्तित्व केवळ सुट्टीपुरतेच जाणवत असे, त्यांनाही सरकारच्या अनेक कार्यक्रमांतून या दिवसाचे महत्त्व यंदा पटणार आहे. आणखीही कारणे आहेत. डॉ. आंबेडकरांचा पुतळा भगव्या रंगात रंगविण्यात आल्यानंतरची ही पहिलीवहिली जयंती. महात्मा गांधी यांना प्रिय असलेला ‘ग्रामस्वराज्य’ हा कार्यक्रम केंद्र सरकारतर्फे नव्या जोमाने निवडक तालुक्यांत सुरू होणार आहे, त्या अर्थाने गांधी-आंबेडकरांचे अपूर्व ऐक्य साधणारी ही पहिलीच जयंती. दलितांच्या सक्षमीकरणावर भर देणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार असली, तरी सर्व केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती देशभरात कुठे ना कुठे, या उपक्रमाच्या प्रारंभदिनी असणारच आहे. शिवाय, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचीही प्रक्रिया सर्वसामान्य फौजदारी कायद्याप्रमाणे असली पाहिजे हा जो दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला, त्यास न्यायालयातच कसून विरोध असल्याचा पवित्रा यंदाच्या आंबेडकर जयंतीस ७२ तास उरले असताना सरकारने घेतलेला आहे. याबद्दल सरकारचे अभिनंदन करावे किंवा कसे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु एक गोष्ट नक्की. मोदी सरकारने यंदा प्रथमच काही पावले टाकलेली आहेत. ती सकारात्मक नसतीलही. पण चळवळीपुढील पेच वाढणार आहे. चळवळ टिकवणार कशी, हा तो पेच. दलित चळवळ टिकवायची म्हणजे नेमके काय आणि कसे टिकवायचे याचा विचार आजवर चुकत गेल्याचीच उदाहरणे अधिक. तेव्हा या वैचारिक पठडीपेक्षा आणि ती पठडी बांधणाऱ्यांच्या राजकारणापेक्षा निराळ्या दिशेला पाहणे आता क्रमप्राप्त आहे. ती निराळी दिशा म्हणजे दलित चळवळ ही सांस्कृतिक चळवळही आहे हे मान्य करणे. या चळवळीतल्या गाण्यांकडे पुन्हा नव्याने पाहणे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on dr babasaheb ambedkar on occasion of birth anniversary
First published on: 14-04-2018 at 02:24 IST