हिंदू धर्मीय राजसत्तेचे उद्दिष्ट इतिहासात तरी धर्मप्रसार हे नव्हते; या वास्तवाकडे न पाहणाऱ्या पुरोगाम्यांच्या पंक्तीत जावेद अख्तर यांनी बसण्याची गरज काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमस्त पण भारदस्त साप्ताहिक ‘द इकॉनॉमिस्ट’च्या मुखपृष्ठकथेचा ताजा विषय ‘द थ्रेट फ्रॉम द इल-लिबरल लेफ्ट’ अर्थात ‘असहिष्णु डाव्यांपासून धोका’ असा असावा आणि त्याच वेळी शायर जावेद अख्तर यांनी नवा वाद उकरून काढावा या योगायोगात मोठा अर्थ आहे. अफगाणिस्तान आणि तालिबानच्या पार्श्वभूमीवर पाहू गेल्यास तो शोधण्याची गरज निर्माण होते. अख्तरसाब हे सामाजिक जाणिवेचे शायर आहेत आणि धर्म या मुद्दय़ावर त्यांची भूमिका सुविख्यात आणि आदरणीयही आहे. आदरणीय अशासाठी की आपल्याकडे पुरोगाम्यांचा एक वर्ग नेहमी फक्त हिंदूंनाच उदारमतवादाचे धडे देत असतो. अन्य धर्मातील मागासांविषयी वा हिंदूंच्या अल्पसंख्याक लांगूलचालनाविषयी हे पुरोगामी नेहमीच बोटचेपी भूमिका घेत आले आहेत. या पोचट पुरोगाम्यांमुळे हिंदू आणि देशाचे जितके नुकसान झाले आहे त्याची तुलना प्रतिगाम्यांमुळे होत असलेल्या नुकसानीशीच व्हावी. जावेद अख्तर असे नाहीत. ते प्रसंगी इस्लाम धर्मीयांसही खडे बोल सुनावण्यास कमी करत नाहीत. त्यामुळे भारतातील अस्सल अ-धर्मवाद्याची जी अवस्था होते तीच त्यांच्या वाटय़ास आली आहे. म्हणजे स्वधर्मी नाकारतात आणि परधर्मी आपले म्हणत नाहीत. वास्तविक अस्सल निधर्मीवाद्यास असा सर्व धर्मीयांकडून नाकारले जाण्यापरता अन्य मोठा गौरव नाही. पण प्राप्त परिस्थितीत मुद्दा अस्सल वा कमअस्सलांचा निधर्मीवाद हा नाही. तसा तो असता तर चर्चेचा परीघ समाजसुधारकांपुरताच मर्यादित राहिला असता. ते नेहमीच संख्येने अल्प असतात. पण जावेद अख्तर यांचे विधान हा परीघ ओलांडून व्यापक आणि बहुसंख्य समाजाच्या भावनांस हात घालणारे असल्याने त्यावर भाष्य आवश्यक ठरते.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on javed akhtar over rss taliban remarks zws
First published on: 06-09-2021 at 02:01 IST