निवडणूक-काळात कितीही पक्षपात झाला असला तरी त्याची शिक्षा भाजपच्या समर्थकांना होता नये आणि िहसाचार थांबावा, याची काळजी ममता बॅनर्जीनाच घ्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यक्ती असो की व्यक्तिसमूहाचे संघटन. त्यांनी विजयात नम्र असावे आणि पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारावा. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या ‘तृणमूल’कडे ही नम्रता नाही आणि विजयापासून वंचित भाजपच्या ठायी खिलाडूवृत्तीचा अभाव. परिणामी त्या राज्यात निवडणुकोत्तर हिंसाचार उसळल्याचे दिसते. या हिंसाचारात भाजपच्या मतदार वा समर्थकांना लक्ष्य केले जात असल्याचे त्या पक्षाचे म्हणणे असून ‘तृणमूल’चा हिंसक इतिहास लक्षात घेता त्यात तथ्यांश असू शकतो. या हिंसाचारातील बळींची संख्या सहा ते बारा अशी सांगितली जाते. आपण संख्येच्या आकारावर हिंसेची तीव्रता मापतो. अधिक बळी म्हणजे अधिक हिंसाचार. वास्तविक हे मानकच मुळी समाज म्हणून आपली नाळ आदिमावस्थेशी किती बांधली गेलेली आहे हे दाखवून देते. आधुनिक समाजात बळींच्या संख्येस महत्त्व नसते आणि प्रत्येकाचा जगण्याचा हक्क त्या व्यवस्थेत जपला जातो. आपला देश आणि त्यातही पश्चिम बंगालसारखे राज्य या आधुनिकावस्थेपासून शेकडो कोस दूर असल्याने तेथे मानवी प्राणाचे मोल शून्य. निवडणुकांसारख्या अतिक्षुद्र कारणासाठीही त्या राज्यात किरकोळीत जीव घेतले जातात. त्यामुळे आताही तसे नसेल असे मानण्याचे काहीच कारण नाही. तथापि या हिंसाचाराचा आकार आणि त्याबाबतचे सत्य हे भाजप करीत असलेला दावा आणि तृणमूल करीत असलेला इन्कार या दोहोंच्या मध्ये असण्याची शक्यता असल्याने ते तपासून घ्यायला हवे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on violence in west bengal after mamata banerjee tmc won election zws
First published on: 05-05-2021 at 03:54 IST