उत्तीर्णांबाबतही काळजी वाटायला लावणारी आपल्याकडची शिक्षणव्यवस्था चिंताजनक ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील, आणि म्हणून अर्थातच या देशातील, गुणवंतांची संख्या पाहिली की कोणाचीही खरे तर दातखीळच बसावी. मंगळवारी जाहीर झालेले दहावीचे निकाल ही दातखिळीची वार्षकि संधीच. एकूण परीक्षेला बसलेल्यांपकी जवळपास ८८ टक्के उत्तीर्ण होतात काय आणि त्यातील काही तर ९८ वा अधिक टक्केही मिळवतात काय. सारेच थक्क करणारे. राज्यातील ही उत्तीर्णाची संख्या साडेचौदा लाख इतकी आहे. म्हणजे तसे पाहू गेल्यास युरोपातील एखाद्या मोठय़ा शहराच्या प्रजेइतके विद्यार्थी यंदा आपल्याकडे शालान्त परीक्षा संपवून महाविद्यालयीन शिक्षणास प्रारंभ करतील. दर वर्षी ही प्रजा चढत्या भाजणीने वाढत असल्याने आपल्याकडे त्यामुळे गुणवंतांच्या संख्येतही भूमिती श्रेणीत वाढ होताना दिसते. खरे तर तसे पाहू गेल्यास कोणालाही अभिमानच वाटायला हवा अशी ही स्थिती. परंतु प्रत्यक्षात मात्र या इतक्या प्रचंड शिक्षित तरुणांच्या तांडय़ाकडे पाहिले असता कोणाही विचारीजनांच्या मनी काळजीच दाटून यावी.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc result 2017 maharashtra educational system education ministry
First published on: 14-06-2017 at 01:48 IST