भारतीय मध्यमवर्गाचा वसाहतकाळापासूनचा उदय, त्यात जन्मजात असलेले उच्चवर्णीयपणापासून आर्थिक अवलंबित्वापर्यंतचे प्रश्न, या वर्गातून ‘नागरी समाज’ बनण्याची प्रक्रिया असा विविधांगी अभ्यास करणाऱ्या ग्रंथाचे परिशीलनही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन भागांत येथे करीत आहोत. त्यापैकी हा पहिला भाग..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्वदीच्या दशकानंतर आणि विशेषत: जागतिकीकरणाच्या स्थिरीकरणानंतर मध्यमवर्गाची, त्यातील बदलांची चर्चा आपल्या विचारविश्वात सातत्याने चालू आहे. मध्यमवर्गाचे नेतृत्व, सामाजिक स्थान, राजकीय-सामाजिक भूमिका, मध्यमवर्गात होणारे बदल या मुद्दय़ांवर ही चर्चा सामान्यत: असते. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उपलब्ध झालेल्या संधीमुळे मध्यमवर्गाचा आकार वाढला आहे. त्याचबरोबर या वर्गाची जीवनशैलीही डोळ्यांत भरण्याइतकी बदलली आहे, ही बाबदेखील चर्चेच्या मुळाशी आहे. याच्या जोडीला गेल्या चार-पाच वर्षांत मध्यमवर्ग राजकीयदृष्टय़ाही आक्रमक होताना दिसतो आहे. अण्णा हजारेंचे आंदोलन, निर्भया प्रकरण यात या वर्गाचा उद्दामपणाही प्रत्ययास आला. राज्यसंस्थेची जागा घेऊ पाहणारा ‘नागरी समाज’ हे त्याचे आक्रमक स्वरूपही त्या वेळी लक्षात आले. या साऱ्याच बाबी मध्यमवर्गाविषयीच्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या आहेत. सामाजिकशास्त्राच्या अभ्यासकांनीही या संदर्भात अलीकडे विशेष लेखन केलेले आहे. दीपंकर गुप्ता, आशुतोष वाष्र्णे, लीला फर्नाडिस, अविजीत पाठक, प्रणय बर्धन, सतीश देशपांडे, नीरज हातेकर ही यातील काही ठळक नावे. मराठीतही याविषयी डॉ. सुधा काळदाते, सुहास पळशीकर, वसंत पळशीकर आदींनी लिहिले आहेच. त्यात आता मोलाची भर पडली आहे ती सुरिंदर एस. जोधका व असीम प्रकाश या अभ्यासकांनी संयुक्तरीत्या लिहिलेल्या ‘द इंडियन मिडल क्लास’ या पुस्तकामुळे.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian middle class book by surinder jodhka aseem prakash
First published on: 08-07-2017 at 03:20 IST