एकदा कायद्याचे राज्य प्रस्थापित झाले की कायद्यासमोर समानतेचे तत्त्व प्रस्थापित होऊ शकते..

‘जनमते मानुस होत सब, यह जानत संसार’ असे कबीर म्हणतात. याचा अर्थ जन्मताना आपण सारे माणूस असतो आणि हे सगळय़ा जगाला ठाऊक आहे. हे माणूस म्हणून समान असणे म्हणजेच समता. संविधानसभेने हे समतेचे मूल्य महत्त्वाचे मानले. त्यानुसार संविधानाच्या मसुद्यामध्ये जगण्याचे स्वातंत्र्य आणि कायद्यासमोरची समानता ही दोन्ही मूल्ये एकाच कलमामध्ये होती. त्यावर बरीच चर्चा होऊन समानतेचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क यांची मांडणी वेगळी केली गेली. त्यामुळे मूलभूत हक्कांची सुरुवातच होते समानतेच्या हक्कांपासून. अनुच्छेद १४ ते १८ हे पाचही अनुच्छेद समानतेच्या हक्कांची मांडणी करतात. व्यक्तीला समान वागणूक मिळेल, याची हमी देतात.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan constitution fundamental rights equal protection amy
First published on: 09-04-2024 at 04:40 IST