‘शीर्षांसनी शिक्षण’ हा अग्रलेख (२० जानेवारी) व ‘असरच्या अहवालाचा बोध काय?’ हे विश्लेषण (२० जानेवारी) वाचले. हा अहवाल सरकारच्या डोळय़ांत अंजन घालणारा आहे. पायाभूत गोष्टी जमत नसतील तर मार्ग बदलावा लागेल. पुन्हा पायाभरणी करावी लागेल. गेल्या काही वर्षांत शिक्षण पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. मुलांना हसतखेळत शिक्षण देण्यावर अधिक भर द्यावा लागेल. त्यासाठी कुशल शिक्षक तयार करावे लागतील आणि त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल, याची काळजी घ्यावी लागेल. शाळांसाठी चांगल्या इमारती बांधल्या आणि काम झाले, असे नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांना लहानपणापासून अवांतर वाचन, लेखन, सामूहिक वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे. सोबतच सोप्या पद्धतीने गणिती प्रक्रिया, प्रयोगातून विज्ञान इत्यादी शिक्षणपद्धती अवलंबता येतील. त्यासाठी गरज आहे प्रबळ इच्छाशक्तीची आणि सोबतच अथक परिश्रमांची. मोबाइल फोन आणि इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधावे लागतील. शाळांनी पालकांशी सतत संपर्क ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात सुजाण नागरिक घडणे हे आव्हान ठरेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oksatta readers opinion on editorial loksatta readers reaction article loksatta readers view on mail zws
First published on: 21-01-2023 at 04:16 IST