शफी पठाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी साहित्य संमेलन हे सर्जनाचे नितळ क्षितिज निर्माण करणारे सशक्त साधन आहे, भोवतालच्या समाजजीवनाचे चिंतनात्मक प्रतिबिंब या संमेलनात उमटत असते व त्याद्वारे तत्त्वचिंतनाची एक नवी वाट साहित्यप्रेमींना गवसत असते, असा एक मतप्रवाह आजच्या नवमाध्यमांच्या जगातही कायम आहे. म्हणूनच मागच्या ९५ वर्षांच्या परंपरेप्रमाणे याहीवर्षी असे एक संमेलन गांधी- विनोबांच्या कर्मभूमीत अर्थात वर्धेला ‘सर्जनात्मक’ पद्धतीने पार पडले. परंतु, आता या संमेलनाची ‘सर्जनात्मकता’च सर्वाधिक चर्चिली जात आहे. अशी संमेलने वर्तमानात नि:संदर्भ आणि अर्थहीन होत चालली असताना त्यांना सर्जनाचे नितळ क्षितिज निर्माण करणारे सशक्त साधन म्हणायचे का, असाही एक प्रश्न या चर्चेतून उपस्थित होऊ लागला आहे. या प्रश्नाला वर्धेच्या संमेलनातील अस्वस्थ करणाऱ्या काही घटनांनी पूरक बळच पुरवले आहे. या घटनांचाच ऊहापोह…

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha marathi sahitya sammelan politicians alloted more time for speech than of hindi language guest literature asj
First published on: 11-02-2023 at 09:32 IST