कॉ. गणपत भिसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्या सुखाचे स्वप्न पाहिले आणि मागासवर्गीयांसाठी संधी निर्माण करून दिल्या. मात्र आपल्या संविधानाच्या वाटचालीत गेल्या अनेक वर्षांत काही समूहांमधील लाखोंना संधी मिळाली, तर काही जातसमूहांतील लाखोंपैकी एकाला संधी मिळू शकली. डॉ. बाबासाहेबांनंतर आपण वस्तुनिष्ठ समानता (सबस्टँटिव्ह इक्वालिटी) आणि वितरणात्मक न्याय (डिस्ट्रिब्यूटिव्ह जस्टिस) अशी प्रणाली उभी करू शकलो नाही किंवा त्यासाठी चळवळ केली नाही. फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीने दिलेल्या जबाबदारीत समाजानेही कसूर केली आहे. मानवी मूल्यांची लढाई जितक्या त्वेषाने आपण लढलो आहोत तितक्या त्वेषाने आपण सामाजिक न्यायाची लढाई लढलेलो नाही. आता जर संघाच्या मुशीत घडलेले नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ‘सामाजिक न्यायाच्या लढाई’चे रणशिंग फुंकलेले असेल आणि तो ध्वनी ऐकूनच उद्या जर करोडो वंचित जनता तयार होणार असेल, तर कुणाची चूक मानायची?

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will narendra modi amit shah give real justice about reservation issues amy
First published on: 04-05-2023 at 08:24 IST