जीवन हे सुख-दु:ख, यश-अपयश, लाभ-हानी, अनुकूलता-प्रतिकूलता असं द्वैतमय आहे. त्यामुळे त्यात अडीअडचणी असणारच. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी त्यात मनाची समता, मनाचं स्थर्य टिकणं हेच महत्त्वाचं आहे. कारण मनाची समता केवळ वाईट परिस्थितीतच डळमळते असं थोडंच आहे? उत्तम परिस्थिती असतानाही, ती कायमची टिकेल ना, या भीतीनंही मन अस्वस्थ राहू शकतं. जोवर जीवन निरपेक्षतेनं जगण्याचा विवेक बाणू लागेल तेव्हाच सर्व तऱ्हेची आसक्ती, दुराग्रह, हट्टाग्रह, मोह-भ्रम मावळू लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशी विवेकी अवस्था प्राप्त करून घेणं हेच या नरदेहाचं सार्थक आहे. एकदा हा विवेक अंगी बाणला की मायेपासून विभक्त होऊन सद्गुरूंचा अखंड भक्ती-योग साधणार आहे. याच महत्कृत्यानं जन्म-मृत्यूचं चक्र संपणार आहे. समर्थ म्हणतात, ‘‘विवेकें चुकला जन्ममृत्यू। नरदेहीं साधिलें महत्कृत्य। भक्तियोगें कृतकृत्य। सार्थक जालें॥’’ आणि इथं समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १०२व्या श्लोकाच्या शेवटच्या दोन चरणांचा सांधा जुळतो. हे चरण असे :

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Right way to worship
First published on: 17-05-2017 at 00:50 IST