हे साधका, तुला आपल्या दोषांची खरंच खंत वाटते का? तर हे भगवंताचं नाम ते दोष ज्या वर्तनातून घडतात त्या वर्तनाचीच ओढ मनातून हळूहळू काढून टाकेल! एकदा दोष मावळले की सदोष वर्तन मावळेल. ते घडलं की पापाचरण थांबेल आणि मग पुण्याचा ठेवा निर्माण होत जाईल. आता भगवंताचं विस्मरण हेच सर्वात मोठं पाप आहे कारण भगवंतापासून मनानं दूर होणं हीच दुर्बुद्धी असते. या दुर्बुद्धीनं अहंभावातून विपरीत वर्तन घडू लागतं. गंमत अशी की माणसाला पाप करायला आवडतं, पण त्या पापाचं फळ भोगायला त्याला आवडत नाही! तेव्हा खरं पाहाता नरकात गुंतवणारं पाप जितकं वाईट तितकंच स्वर्गात अडकवणारं पुण्यसुद्धा वाईटच असतं. फरक इतकाच की पापाचरणाचा लोकांना त्रास होतो, पुण्याचरणानं ते घडत नाही. आणि एकदा पुण्याचरण सुरू झालं की सद्बुद्धीही जागी होते आणि ती अंतरंग व्यापक केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही! तेव्हा संकुचित माणसानं व्यापक होणं, यापेक्षा उत्तम गती दुसरी कोणती आहे? तर एका नामाच्याच आधारावर इतकी झेप घेता येते, असं समर्थ सांगतात. पण एवढय़ानं मन काय सहजासहजी नामाला तयार होतंय थोडंच! ते मन अनेक प्रश्नांचं जाळ फेकू लागतं आणि या प्रश्नांच्या अनुरोधानं समर्थ ‘मनोबोधा’च्या ७२व्या श्लोकात पुन्हा फटकारतात! समर्थ म्हणतात –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न वेंचे कदा ग्रंथिचे अर्थ कांहीं।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 27-12-2016 at 03:41 IST