‘मनोबोधा’च्या १०६व्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत समर्थ स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकानं आवरण्याचा स्वाध्याय सांगत आहेत. स्नानानं जसं आपण शरीर शुद्ध करतो त्याप्रमाणे सद्विचारांनी मन शुद्ध करायचं आहे. त्यानंतर परमतत्त्वाशी जोडणाऱ्या त्या विचारांचं स्मरण, चिंतन आणि मनन करायचं आहे. मग विवेकपूर्वक मनाच्या आवेगांना रोखायचं आहे. वासना नष्ट करणं, हे आपल्या आवाक्यातलं काम नाही; पण आपण मनोवेगांची गती रोखू शकतो आणि हे आपण व्यावहारिक जगातही अनेक वेळा करतो, बरं का!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समजा आपली काहीही चूक नसताना आपला वरिष्ठ अधिकारी आपल्याला काही उलटसुलट बोलला तरी प्रत्युत्तर देण्याची इच्छा आपण मनातच दडपून टाकतो. एखाद्याकडे पाहुणे म्हणून गेलो असलो आणि आपल्या आवडीचा पदार्थ तिथं जेवणात असला तरी तो भरमसाट खाण्याचा मोह आपण दडपून टाकतो. अशी अनेक उदाहरणं आपण विचार केलात तर आठवतील. त्यामुळे मनोवेगांना रोखणं काही अशक्यप्राय गोष्ट नाही. हे मनोवेग जसजसे आटोक्यात येऊ  लागतील तसतसं या आवेगांच्या पकडीत सापडून आपण कसे असाहाय्य झालो होतो.. भावनिकदृष्टय़ा परावलंबी झालो होतो, याची जाणीव होऊ  लागेल. त्यानं विवेकभानच अधिक जागृत होईल.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 19-06-2017 at 02:36 IST