समर्थ रामदास ‘दासबोधा’त म्हणतात, ‘‘कल्पना जन्माचे मूळ’’! कल्पनेतच माणसाचा जन्म आहे. म्हणजे कसं? तर माणूस हा कल्पनाप्रधान प्राणी आहे. ‘आज ना उद्या पूर्ण सुख मिळेलच,’ या कल्पनेमुळेच तर तो अनंत वेळा वासनेच्या पोटी जन्मतो आणि अतृप्तीच्या अग्नीदाहातच मरतो, पण ‘या जगातच सुख मिळेल,’ ही त्याची कल्पना काही मरत नाही. त्या कल्पनेनुसार सुख मिळवण्यासाठी या जगातली त्याची ये-जा काही संपत नाही. त्या कल्पनेतूनच त्याचे विचार, त्याच्या कामना-वासना घडत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणजेच माणसाच्या मानसिक, भावनिक आणि वैचारिक घडणीत कल्पनेचा वाटा मोठा आहे. माणूस कल्पनेची जोड दिल्याशिवाय विचार करू शकत नाही. उदाहरणार्थ ‘पुढे काय घडेल,’ याचा विचार माणूस कल्पनेनंच करतो. विपरीत कल्पनांनी माणसाचं मन नकारात्मक विचारांमागे वाहावत जातं तर उदात्त कल्पनांनी माणसाचं मन सकारात्मक विचारांनी भरून जातं. एखादा माणूस मनातल्या भीषण कल्पनेनं जेव्हा भारला जातो तेव्हा ती कल्पना इतरांना धोका उत्पन्न करते. जसं, ‘दुसऱ्याला मारून मी सुखी होईन,’ या कल्पनेनं एखादा भारून जातो तेव्हा परघात करण्यात तो मागचापुढचा विचारही करीत नाही. एखाद्या माणसाच्या मनातल्या अशा भीषण कल्पनेला जेव्हा आणखी काही लोकांची साथ मिळते तेव्हा समूहाच्या जगण्यालाही धोका उत्पन्न होतो.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 26-09-2017 at 02:28 IST