खरं पाहाता काही क्षण असे असतात, जेव्हा मनुष्य स्वत:लाही विसरून काही क्षण अशा मनोवस्थेत लीन होतो जेव्हा त्याच्या मनात कोणत्याही कल्पना, कोणतेही विचार नसतात आणि तरीही तो आनंदात असतो. अशा क्षणांचा लाभ बाह्य़ जगातल्या कोणत्याही गोष्टीनं अचानक झाल्याचं भासतं. मग एखादं गाणं ऐकताना हा क्षण गवसो की एखादं पुस्तक वाचताना तो गवसो.. निमित्त बाह्य़ जगातलं असलं तरी जी अंतर्मुखता त्यातून येते आणि जी आत्ममग्नता येते ती मात्र निर्विचारी, निर्विकारी असते. असा क्षण वारंवार वाटय़ाला येतच नाही. तो अतिशय दुर्मीळ असतो, तरीही त्या क्षणानं मन ज्या आनंदमय पातळीवर जातं त्याचा ठसा मागे उरतो. आपल्यातच असलेला जो निजानंद आहे, जे आत्मसुख आहे त्याची ही अगदी नगण्यशी झलक आहे! माणूस मुळातच आनंदस्वरूप आहे आणि आनंदात राहाण्याची त्याला म्हणूनच जन्मजात ओढ आहे. अगदी जवळ असूनही दुरावलेला हा आनंद  कसा गवसावा, हे काही त्याला कळत नाही. तो आनंद मिळवण्यासाठी म्हणून जी काही धडपड करीत राहातो त्यातून तो कधी सुख आणि कधी दु:खं, यातच हेलकावे खात राहातो. त्यामुळे  सुख मिळालं तरी ते ओसरण्याच्या वेदनेनं त्याचं मन मधेच जडावत असतं.  तेव्हा हा निजानंद, हे आत्मसुख मिळवण्यासाठी जो जाणता आहे त्याचाच आधार घ्यायला समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४१व्या श्लोकात सांगत आहेत.  हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू, मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणे दास सायास त्याचे करावे।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 10-11-2017 at 02:59 IST