मनोबोधाच्या २८व्या श्लोकात आपण पाहिलं की, सद्गुरूंची काळावर सत्ता आहे, जो नित्यनेमात आहे त्याला हा नित्य अनुभव येईल. २९व्या श्लोकात आपण पाहिलं की काळावर सत्ता असूनही श्रीसद्गुरू काळाची मर्यादा राखून देहावतार संपवतात, मात्र आपल्या अनन्य भक्तांना नि:संग आणि भेदरहित अशा अंत:करणरूपी अयोध्येत स्थिर करतात. तर ३०व्या श्लोकात अनन्य होण्याची प्रक्रिया म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे त्यांच्या बोधानुरूप जगणं, हे आपण जाणलं. असा जो सेवक आहे त्याच्याकडे आंतरजगतातील सूक्ष्म विकार तरंगदेखील वाकडय़ा नजरेनं पाहू शकत नाही, हे समर्थ सांगतात. आता ३१व्या श्लोकात समस्त चराचर सद्गुरूंसमोर कसं नतमस्तक आहे आणि त्यांच्या परमाधारावर टिकून आहे, हे समर्थ सांगत आहेत. ३२व्या श्लोकात अचेतनवत झालेल्यांतही चेतना निर्माण करण्याचं त्यांचं सामथ्र्य सांगतात आणि ३३व्या श्लोकात चेतन-अचेतन अशा या सृष्टीतील सद्गुरूपरंपरेचं चिरंजीवत्व नमूद करतात! तर प्रथम ३१व्या श्लोकाकडे वळू. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ असा आहे:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महासंकटीं सोडिलें देव जेणें।

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 03-08-2016 at 04:42 IST