भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह झाले म्हणून कोणाला संताप येतो? कम्युनिस्ट पक्षाचे नेते अनेक आणि कार्यकर्तेही हजारो असताना एखाद्या डाव्या विचाराच्या व्यक्तीला संपवावे, असे कोणाला वाटू शकते? आदिवासींच्या व्यथावेदना मांडणाऱ्या तरुण, धडाडीच्या पत्रकाराची अडचण कोणाला होत असावी? हत्या झालेले कोण होते, हे लक्षात घेतले तर हत्या करणाऱ्यांची मानसिकता उघड होऊ लागते.. हे उजव्या गटांचेच, असे वेगळे सांगावे लागत नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्यात आले होते. सॉक्रेटिसला विषाचा प्याला देण्यात आला होता. सर थॉमस मूर यांचा शिरच्छेद करण्यात आला होता. वैचारिक निष्ठांपायी या तिघांचा जीव घेण्यात आला. अलीकडल्या काळात, पाच जणांच्या हत्या भारतीय लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला हादरा देणाऱ्या ठरल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी या प्रत्येक हत्या-प्रकरणातील मारेकरी आणि सूत्रधार कोण असावेत यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यांमधील पोलीस दलेसुद्धा हत्या करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. काही जणांना अटकही झालेली आहे; पण म्हणून या प्रकरणांचा छडा लागला किंवा लवकरच लागेल, अशी शक्यता मात्र नाही हीच वस्तुस्थिती दिसते. पोलीस आणि प्रसारमाध्यमे ही मारणाऱ्यांवरच लक्ष केंद्रित करीत असताना, मला थोडा निराळा विचार इथे मांडायचा आहे.

मराठीतील सर्व समोरच्या बाकावरून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Killed and the killers article by p chidambaram article gauri lankesh narendra dabholkar govind pansare m m kalburgi
First published on: 10-10-2017 at 02:34 IST