भारतात सध्या ५जी नेटवर्क सुरू झाले आहे. हे ५जी नेटवर्क लाखो लोकांना देशामध्ये अनेक गोष्टी वेगात डाऊनलोड करणे, स्ट्रीमिंग व अखंड व्हिडीओ कॉल आणि अनलिमिटेड कनेक्टिव्हिटी ऑफर करीत आहे. भारतात ५जी सेवा सुरू होऊन बरेच महिने झाले आहेत. Airtel आणि Jio या भारतातील दोन टेलिकॉम कंपन्या अशा आहेत की, ज्यांनी या भारतात पहिल्यांदा 5G सेवा सुरू केली. पण, या दोन्ही कंपन्यांनी अद्याप ५जी प्लॅन्स जारी केलेले नाहीत. याचा अर्थ असा की, अद्याप कोणतेही वापरकर्ते ५जी प्लॅन न घेता, ५जी स्पीड नेटवर्कचा लाभ घेत आहेत.

जिओ आणि एअरटेल या कंपन्या एक वर्षाहून अधिक काळ मोफत ५जी डेटा ग्राहकांना पुरवीत आल्या आहेत. आता या कंपन्या प्रीमियम ग्राहकांना मोफत अमर्यादित ५जी सेवा देणे बंद करणार आहेत. म्हणजेच २०२४ या वर्षात ग्राहकांना ५जी डेटा वापरण्यासाठी ५ ते १० टक्के जास्त किंमत द्यावी लागणार आहे. दोन्ही कंपन्या ५जीसाठी वेगळे प्लॅन्स जाहीर करणार आहेत.

हेही वाचा…प्रतीक्षा संपली! ग्राहकांना सॅमसंग Galaxy च्या ‘या’ स्मार्टवॉचमध्ये मिळणार हेल्थ फीचर्स…

जिओ आणि एअरटेल कंपनीचे ५जी प्लॅन्स ४जीच्या तुलनेत ५ ते १० टक्के जास्त महाग असण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांनी ५जीमध्ये केलेली गुंतवणूक पाहता, हे दोन्ही दूरसंचार ऑपरेटर्स त्यांच्या भांडवलावरील लाभ / रिटर्न ऑन कॅपिटल एम्पलॉयड (ROCE) सुधारण्यासाठी २०२४ च्या सप्टेंबर तिमाहीत रिचार्ज प्लॅनमध्ये २० टक्के वाढ करतील, अशी शक्यता उद्योगतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांचे मिळून १२५ दशलक्ष ग्राहक आहेत. तर ५जी प्लॅन्स कसे असतील हे पाहू…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१. ५जी योजना खरेदी करण्यासाठी वापरकर्त्यांना पाच ते दहा टक्क्यांपर्यंत जास्त खर्च करावा लागू शकतो.
२. ५जी प्लॅनमध्ये ४जी प्लॅनच्या तुलनेत ३० टक्के जास्त इंटरनेट डेटा दिला जाऊ शकतो.
३. सध्या 4G प्लॅनमध्ये सामान्यतः 1.5GB ते 3GB प्रतिदिवस डेटा प्लॅन दिला जातो. पण, ५जी प्लॅनमध्ये सुमारे 2GB ते 4GB प्रतिदिन डेटा प्लॅन दिला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.